तिकीट वाटपावेळी शांत राहण्यासाठी ज्यांना ज्यांना शब्द दिला, त्यांना काय चुना देऊ का? - अजित पवार


Pandharpur Live : 'त्यांना विधानपरिषदेवर घ्या' असे एक कार्यकर्ता मेळाव्यात म्हटल्यावर, 'बाकीच्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का?' असा शब्दांत सुनावत अजित पवार भडकले. उगाच काहीही बोलून चिडायला लावू नका, असे म्हणत विधानसभेचे तिकीट देऊनही बदाबदा पडतात, ज्यांना संधी दिली त्यांनी त्या संधीचे सोनं करण्याऐवजी राख केली. सगळंच त्यांना द्यायचे म्हटल्यावर तिकीट वाटपावेळी शांत राहण्यासाठी ज्यांना ज्यांना शब्द दिला, त्यांना काय चुना देऊ का, अशा शैलीत पवार यांनी समाचार घेतला. ज्याने जीवाचे रान केले, पक्षाला ताकद दिली त्या अमोल मिठकरींना विधानपरिषदेवर घेण्यासाठी पक्षाकडे नक्की मागणी करेन. 

'विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष अडचणीत असताना अनेकजण पक्षाला सोडून गेले, त्यांना 'रेड कार्पेट'
टाकू नका, जरा सबुरीने घ्या' असे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, 'आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणार नाही, परंतू, नंतर तुम्हीच 'आता तो सुधारलाय, त्याला त्याची चूक कळली' असे म्हणून पक्षात घ्यायला लाऊ नका. कारण, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेकजण आहेत. ती निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीची असतात. त्यामुळे पक्ष, आपल्या नेत्यासाठी मर मर राबतो, आमदार निवडून आणायला मदत करतो तोच बाजूला राहतो. त्याच्याआधीच दुसरा येऊन 'मी कसा चांगला' असे दाखवतो.

यावेळी पक्ष सोडून गेलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रदीप कंद यांच्यावर पवार यांनी निशाणा साधला. 'कामठे यांना झेडपी आणि जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले तरी त्याची सटकली आणि तो गेला. त्यामुळे पुरंदर आणि हवेलीची जागा यायला मदत झाली. काही लोक आपल्याजवळ राहिली, मात्र ती पक्षाला मदत करत नसतात तर ओझे असते. ते आज कमी झाले. काही बहाद्दरांना जाऊ नका असे म्हटले तर 'आमची चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झाली आता मागे येणार नाही,' असे त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

1 Comments