पंढरपूर लाईव्ह- :
नवी दिल्ली : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं वायूसेनेच्या मदतीनं मोठं बचाव कार्य सुरू केलं आहे. आज पहाटे सहा वाजेपर्यंत एकूण 540 भारतीय पर्यटकांना मायदेशी आणलं आहे. 55 भारतीयांना आणणारं वायूसेनेचं पहिलं विमान रात्री 11 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर रात्री दीड वाजता 102 भारतीयांना दुसऱ्य़ा विमानानं परत आणलं. तर सकाळी 4 च्या सुमारास तीसरं विमान नवी दिल्लीत आलं ज्यामधून 152 भारतीयांना परत आणलं. यानंतर मग सकाळी 6 वाजता चौथं विमान दिल्लीत पोहोचलं ज्यामधून 231 भारतीय परतले. मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तर अनेकांना अश्रू अनावर झाले.जगभरातून मदतीचा हात
नेपाळमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी अनेकांनी संसार उघड्यावर पडलेत,.. मृतांचा आकडा तासागणीक वाढत चालला आहे. तर अजूनही हजारो लोक मृत्यूशी झुंज देत आहे. या नैसर्गिक आपत्तीतून नेपाळला सावरण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे.
भारतानं नेपाळमधल्या जखमींच्या उपचारासाठी
सर्व सोयी सुविधांनीयुक्त असं आत्याधुनिक रूग्णालय नेपाळमध्ये उभारलं आहे.
आज सकाळपासून हे रुग्णालय काठमांडूत आपलं काम सुरू करेल. भूकंपग्रस्तांना
लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालाय असतील. याशिवाय पुढचे आठ दिवस 24 तास काम करण्यासाठी लागणारं साहित्य
या रुग्णालासाठी काल रात्री उशिरा नेपाळमध्ये भारतीय वायूसेनेच्या विमानानं
पाठवण्यात आलं आहे.भारतासह इस्त्राईल, पाकिस्तान, इंग्लंड, अमेरिका हे देशही अशीच रूग्णालयं उभारत आहेत. भारतातून अडीचशेपेक्षा जास्त एनडीआरएफचे जवान नेपाळमधल्या बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. तर 2300 टन खाण्या-पिण्याचं साहित्य नेपाळमध्ये पोचवण्यात आलं आहे.







0 Comments