महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु...महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या हायव्होल्टेज बैठकी


Pandharpur Live Web- महाराष्ट्रात सत्ता नाट्यामध्ये आता हालाचालींना मोठा वेग आला आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 

संध्याकाळी 5:30 वाजता राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात आली. याच पार्श्वभूमिवर राजभवनावर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यादरम्यान, चारही महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या हायव्होल्टटेज बैठकी मुंबईत होत आहेत. त्यामुळे आता राज्यात आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.


एकीकडे राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीसाठी राष्ट्रपती शासनास शिफारस पत्र पाठवण्यात आलं होतं. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधीचं निवेदन शेअर करण्यात आलं होतं.

त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, यानंतर आता राज्यात चारही पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत. 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 2014 मध्ये एक महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळूनही या दोन घटकपक्षांमध्ये मतभेद झाले आणि सरकार स्थापन करण्यात युती अपयशी ठरली. त्यानंतर गेले 3 दिवस वेगवान राजकीय घडामोडी घडल्या पण एकही पक्ष पुरेसं संख्याबळ दिलेल्या मुदतीत उभं करू शकला नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकाच गाडीतून मातोश्रीवरून निघाले आहेत. ते नेमके कोणाला भेटण्यासाठी निघाले यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या या हालचालींना महत्त्व आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावर थोड्याच वेळात पवारांशी चर्चा करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीत आघाडीची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची संध्याकाळी 'वर्षा'वर बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. यात भाजपचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनेच्यावतीने सध्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, केंद्र सरकारने राष्ट्रपती शासन लागू केली. त्यामुळे आता शिवसेनेला नवीन याचिका दाखल करण्याची वेळ आली आहे. नवीन याचिका तयार करण्याचे काम कपिल सिब्बल आणि त्यांची चमू करीत असून लवकरच ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

राष्ट्रपती राजवटीची प्रक्रिया -
> राज्यपालांनी राज्यातील कारभार घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालू शकत नाही असा अहवाल राष्ट्रपतींना दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होते.
> राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक आहे. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्या राज्यात सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू असते.
> राष्ट्रपती राजवट कालावधी वाढावायचा असल्यास परत संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. अशी दर सहा महिन्यांनी मान्यता मिळवून राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त तीन वर्षे लागू राहू शकते.
> राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्रे राष्ट्रपती आपल्या हातात म्हणजेच केंद्र सरकारच्या हातात घेऊ शकतात, तर राज्य विधिमंडळाचे सर्व कार्य संसदेकडे दिले जाते. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून या काळात राज्यपालच मुख्य सचिवांच्या मदतीने प्रशासन चालवतात.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments