मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी मुंबई पोलिसांनी बारा तासांच्या आत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिला मूळगावी मध्य प्रदेशात जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे निघाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ निर्जनस्थळी गाठून, आरोपींनीहे क्रूर कृत्य केलं. याशिवाय तिचे पैसे आणि दागिनेही लुटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचं तीन वर्षापूर्वी निधन झालं आहे.
ही घटना घडत असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तिथून आपल्या दुचाकीवरुन जात होती. त्यांनीदेखील या महिलेवर बलात्कार केला. याशिवाय पीडित महिलेचे रोख 3 हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून पळून जात होते. मात्र हा सर्व प्रकार रस्त्याने जाणाऱ्या अन्य महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने तातडीने 100 नंबरवर फोन करुन माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, स्थानिकांच्या मदतीने दोन आरोपींना तिथल्या तिथे अटक केली. तर अन्य दोन आरोपी पळून गेले.
मात्र पोलिसांनी उर्वरित दोन्ही आरोपींनाही आज पहाटे बेड्या ठोकून त्यांच्या मुसक्या आवळल्या. बारा तासाच्या आतच पोलिसांनी या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.


0 Comments