आळंदीत भक्ती शक्ती संघाच्या वतीने निराधारांना मायेची ऊब

आळंदी : महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार, प्रवचनकार,गायक,वादक आणि वारकरी विद्यार्थी यांनी हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या भक्ती शक्ती संघाच्या वतीने आळंदी शहरातील निराधार नागरिकांना कडाक्याच्या थंडीतही इंद्रायणी नदीच्या घाटावर तसेच रस्त्याकडेला झोपणाऱ्यांना उबदार ब्लँकेटचे वाटप करून त्यांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला.

 थंडीत कुडकुडणाऱ्यां अनाथ आणि निराधारांना व गरजू व्यक्तींना गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरात थंडीचा कडाका वाढला त्यात त्या नागरिकांना थंडीच्या बचावासाठी उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले आहे असे भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले. ज्यांना डोक्यावर छत आहे,त्यांना थंडीची झळ बसणार नाही. पण जे आभाळालाच छत समजून उघड्यावर राहतात, त्यांचे काय, त्यांच्यासाठी ही थंडी जीवघेणी ठरते.अशाप्रकारे थंडीत उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लँकेट भेट देऊन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे असे भक्ती शक्ती संघाचे कार्याध्यक्ष हभप संग्रामबापू पाटील यांनी सांगितले. 

 यावेळी आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया,मुंबईचे नगरसेवक जगदिश तरे,जिल्हा परिषद सदस्य संजय चिकनकर,संदीप लोरे,दिपक ठाकरे,निरंजन कोठेकर,रविंद्र चव्हाण,सारंग क्षीरसागर,नामहरी पाचपुते,श्रीकांत दुराफे,कौस्तुभ गायकवाड,परमेश्वर वरकड,लक्ष्मण पाटील,अभय कुलकर्णी,संतोष काकडे आणि अविरत फाउंडेशन चे निसार सय्यद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments