ईश्वर वठार (ता.पंढरपूर) केले येथील लोकसहभागातून बांधण्यात आलेला वनराई बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलेला असून सोबत कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी व शेतकरी.पंढरपूर लाईव्ह:- शासनाच्या कृषी विभागा मार्फत लोकसहभागातून बांधण्यात आलेले वनराई बंधारे अवकाळी झालेल्या पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे बंधा-याच्या परिसरातील शेतक-यांना याचा मोठा फायदा होत असल्याची माहिती कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतिने राबवण्यात आलेल्या कृषी विभागातर्फे ग्रामीण भागात शेतक-यांच्या सहभागातून शेतक-यांच्या शेतामध्ये वनराई बंधारे बांधण्याचे काम चालू आहे.
यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यामध्ये माती भरुण ही पिशवी खोलगट चारीमध्ये टाकूण पाणी अडवण्यासाठी वनराई बंधारे तयार करण्यात येत असून, अशा बंधा-यांमुळे पाणी अडवून शेतक-यांना या पाण्याचा मोठा फायदा होत आहे.
या शासनाच्या कृषी विभागाच्या धोरणास प्रतिसाद म्हणून ईश्वर वठार (पंढरपूर) येथे बांधण्यात आलेला वनराई बंधारा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरला आहे. अशा प्रकारे विविध ठिकाणी कृषी विभागाच्या वतिने बंधारे बांधण्याचे काम चालू आहे.
यासाठी तुंगतचे मंडल कृषी अधिकारी आर.एस.शेंडगे, कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी, भारत पांढरे, पांडूरंग हळणवर, बाळ कुंभार, विकास घागरे, विठ्ठल घागरे, शैलजा सलगर, मारोती घोडके, दशरथ डूबल, बाळासो डूबल, बंडू धाराशिवकर व शेतक-यांनी प्रयत्न केले.
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या शासनाच्या कृषी विभागाच्या धोरणास प्रतिसाद म्हणून ईश्वर वठार (पंढरपूर) येथे बांधण्यात आलेला वनराई बंधारा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरला आहे. अशा प्रकारे विविध ठिकाणी कृषी विभागाच्या वतिने बंधारे बांधण्याचे काम चालू आहे.
यासाठी तुंगतचे मंडल कृषी अधिकारी आर.एस.शेंडगे, कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी, भारत पांढरे, पांडूरंग हळणवर, बाळ कुंभार, विकास घागरे, विठ्ठल घागरे, शैलजा सलगर, मारोती घोडके, दशरथ डूबल, बाळासो डूबल, बंडू धाराशिवकर व शेतक-यांनी प्रयत्न केले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments