पंढरपूर लाईव्ह:-
मुंबई: वर्ल्डकपमध्ये धोनीच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा ‘मौका’ साधला आहे. भारताने बांगलादेशचा वचपा काढत अवघ्या 193 धावांत खुर्दा उडवला आणि तब्बल 109 धावांनी विजय मिळवला.
वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय आहे. तर धोनीच्या नेतृत्त्वातील हा 100 वा विजय आहे. या विजयासह टीम इंडियाने दिमाखात वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
टीम इंडियाचा हिट मॅन रोहित शर्माला झुंजार शतकाबद्दल 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने सलामीवीर रोहित शर्माचं धडाकेबाज शतक आणि सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर, बांगलादेशसमोर 303 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशी टीम 45 षटकात 193 धावांत गारद झाली.
भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 4, मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मोहित शर्माला एका विकेटवरच समाधान मानावं लागलं.



.jpg)





0 Comments