पुणे- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहाची मेस 2 दिवसांपासून बंद आहे. 500 मुले उपाशी असल्याची घटना समोर आली आहे. मेसमध्ये अन्न शिलक्क नसल्याने अंध मुलांना उपासमारी सोसावी लागत आहे. ग्लास आणि भांडे वाजवत छात्र भारती विद्यार्थी संघटना व विद्यार्थिनींनी या घटनेचा निषेध केला आहे.
वसतिगृहात कुठल्याच सुविधा नाहीत. सर्वत्र अस्वछता आहे. कोणताच अधिकारी मुलांचा फोन उचलत नसल्याने मुले हवालदिल झाले आहे. समाज कल्याण विभागाने हे वसतिगृहात सुरु आहे. मात्र, अकार्यक्षम अधिकार्यांमुळे या वसतिगृहाचे तीनतेरा झाले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!







0 Comments