मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यासदर्भांत मराठा आमदारानी काय केले ? मुबंई मोर्चा दरम्यान दिलेल्या आश्वासनाची दोन महीन्यात अमलंबजावनी न झाल्यास नेत्याना गावबंदी

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com


कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18  August 2017

निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९
 
 मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,कोपर्डीतील आरोपीना ,फाशीची शिक्षा द्यावी ,शेतकर्याचे सरसकट कर्ज माफ करावे यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या सख्येंने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले परंतू मराठा क्रांती मुक मोर्चाच्याच्या मागण्या सदर्भात राज्यातील मराठा आमदारानी काय केले असा सवाल आत्ता मराठा बाधवातून उपस्थित होत आहे आणि मुबईतील मराठा मोर्चात राज्यसरकारने दिलेल्या आश्वासनाची दोन महीण्यात अमंलबजानी न झाल्यास नेत्याना गावबंदी करू असा ईशारा मराठा बाधंवाच्या वतीने देण्यात आला आहे
याबाबत आधिक माहीती अशी कि,मराठा समाजाच्या वतीने 9आँगस्ट 2016रोजी पासून आपल्या विवीध मागण्यासदर्भात राज्यभर आणि देश विदेशात ही लाखोच्या सख्येने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत परंतू या मराठा क्रांती मुक मोर्चातील मराठा समाजाला आरक्षण द्यावे,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात ,कोपर्डीतील नराधमाना फाशी द्यावी ,शेतकर्याचे सरसकट कर्ज माफ करावे ,गडकिल्याचे सवर्धंन करावे ,या सह आदी मागण्या मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या होत्या परंतू या मराठा क्रांती मुक मोर्चातील मागण्याबाबत राज्यातील मराठा आमदाराना काय केले असा सवाल मराठा बाधवातून उपस्थित होत आहे त्यामुळे मराठा आमदारानी मराठा क्रांती मुक मोर्चाच्या मागण्या माण्य करण्यासाठी लवककात लवकर प्रयत्न करावेत नसता मराठा आमदारांना येणार्या निवडणूकीत जागा दाखवली जाईल असा ईशारा मराठा बांधवाच्या वतीने देण्यात आला आहे
आणि तसेच 9आँगस्ट 2017रोजी राज्यसरतारने दिलेल्या आश्वासनाची अमलबजानी न झाल्यास मराठा नेत्याना गावबंदी करण्यात येईल असा ईशारा मराठा बाधवाच्या वतीने देण्यात आला आहे

चर्चेला गेलेल्या समन्वयक गेले होते भांडाफोड होईलच पण ..!
20 ऑगस्ट पर्यंत आपल्या सर्व मागण्यांचे GR नाही निघाले तर जे समन्वयक सरकारची लाज वाचवण्यासाठी समाजाची लाज वेशीला टांगुन मंत्रालयात चर्चेसाठी गेले होतं त्यांचा भांडाफोड तर होईलच पण ज्या मराठा आमदारांची ते पाठराखण करत आले आहेत त्यांनाही धडा शिकवणे गरजेचं झालंय !
 आता वेळ आली आहे त्यांनापण त्यांची लायकी दाखवुन देण्याची
खुप वेळा ऐकलं आणि वाचलं कि आपण आपल्या लोकप्रतिनीधींना दुय्यम भुमिका दिली म्हणुन यावेळी त्यांना पुढाकार घेण्याची विनंती करण्यात आली, काय दिवे लावले यांनी आजपर्यंत ?? *लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात पण त्यांना एवढं चढवुन ठेवलं आहे की ते स्वतःला समाजाचं मालक समजु लागले आहेत !* आता वेळ आली आहे त्यांनापण त्यांची लायकी दाखवुन देण्याची !
*सत्तेच्या ताटाखालचं मांजर झालेल्या लोकप्रतिनिधींनी मराठ्यांच्या मागण्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं आहे* जणु त्यांचा आणि समाजाचा काही संबंधच नाही एवढे मुजोर झालेत हे लोक ! यांना जाब विचारणं गरजेचं ! त्यांना धडा शिकवणं गरजेचं झालंय !

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments