सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सोमवारी दि.१जुलै रोजी दुपारी साधारण दोनच्या सुमारास घटना घडली असल्याचे समजते.
पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय वर्षे ४०), संकेत शिवानंद चौरमोले (वय वर्षे १७), पार्वती मलप्पा कोरे (वय वर्षे ४४) यांचा मृत्यू झाला. तर रविकांत राजकुमार मुळे (वय वर्षे ९३) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय वर्षे ९२) हे दोघे जण जखमी आहेत.जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंद्रुप गावावर शोककळा पसरली आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंद्रुप गावावर शोककळा पसरली आहे.





0 Comments