भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावातील कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. एकुण 30 गावातील 7513 कुटुंबांस पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागले आहे. पंढरपूर शहरातही नदीकाठच्या अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना आपले सांसारिक साहित्य घेऊन सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. दरम्यान आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी रामबाग येथे स्थलांतरीत झालेल्या पुरग्रस्त नागरिकांची भेट घेवुन पाहणी केली. यावेळी पुरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
तालुक्यातील स्थलांतरीत कुटूंबाची लोकसंख्या
पटवर्धन कुरोली (460), शिरढोण (513), खेडभाळवणी (285), शेळवे (363), व्होळे (1130), पि.कुरोली (563), वाखरी (78), वाडीकुरोली (263), देवडे (426), कौठाळी (38), पुळूज (63), आंबेचिंचोली (5), आंबे (128), गोपाळपूर (61), मुंढेवाडी (9), उंबरे (35), करोळे (285), सुस्ते (1005), भटुंबरे (135), नांदोरे (413), गुरसाळे (335), शेगाव दुमला (445), इश्वर वठार (63), चिंचोली भोसे (38), अजनसोंड (313), देगाव (110), ना. चिचोली (130), खेडभोसे (76), सरकोली (10) आवे-तरटगांव (35)
एकूण 7513
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पुरग्रस्तां ना आवश्यक ती मदत देणार- पालकमंत्री विजय देशमुख
पंढरपूर, दि. 07 :- वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, पूरग्रस्तांना आवश्यक मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
पंढरपूर येथील रामबाग येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांची पालकमंत्री देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार मधूसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत महानोर तसेच नगरसेवक आदी उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
यावेळी श्री. देशमुख म्हणाले, पुणे परिसरात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने वीर व उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे निरा व भीमा नदी काठच्या गावांत व पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या भागात पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरस्थितीमुळे स्थ्ंलातरीत झालेल्या कुटूबांना प्रशासनामार्फत आवश्यकती मदत करण्यात येत आहे. त्यांची कोणतेही गैरसोय होणार नाही त्यांना लागेल ती मदत तातडीने पुरवण्यात येतील.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पूरग्रस्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. त्यामध्ये आरोग्य विभागाकडून औषधोपचार, स्वच्छ पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, पुरवठा विभागामार्फत धान्य व केरोसिन वाटप आदीबाबतीची माहिती दिली तसेच आवश्यक तात्काळ मदतीसाठी प्रशासनातील सर्व विभाग सज्ज असल्याचे सांगितले.
पूरग्रस्तांनी समस्या मांडल्या त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी संबधित विभागाला दिले.
पालकमंत्री देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या शिरढोण, कौठाळी गावांना भेट देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments