पंढरपूर (प्रतिनिधी) :- “ ग्रामीण भागातील कवी व लेखक यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण विषयावर आणि वैविध्यपूर्ण प्रकारचे सकस तसेच दर्जेदार साहित्य निर्माण होत आहे. ” असे मत येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले. ते येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादासाहेब खरात यांच्या ' थर्ड डिग्री ' या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कल्याणराव काळे म्हणाले “ ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखनातून वेगवेगळ्या भागातील ग्रामीण रुढी, परंपरा आणि संस्कृती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महनीय कार्यही सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील रुढी, परंपरा आणि संस्कृती अधिकाधिक भागात पोहोचत आहे. ”
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. शिवाजीराव बागल, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे, साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वामन जाधव, भगवंत उद्योग समूहाचे धनाजीबापू देशमुख, लेखक बा. ना. धांडोरे, विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार, टॉपर्स अकॅडमीचे संचालक गणेश धांडोरे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभात लेखक दादासाहेब खरात यांनी कथासंग्रहातील कथांच्या कथाबीजापासून कथापूर्तीपर्यतचा प्रवास थोडक्यात सांगितला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
यावेळी बोलताना श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे म्हणाले “ साहित्यिकांच्या वैविध्यपूर्ण लेखनाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे. ” तर साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वामन जाधव यावेळी कथासंग्रहातील कथांची समीक्षा करताना म्हणाले “ दादासाहेब खरात यांच्या कथा या समाजातील सर्व स्तरातील वैविध्यपूर्ण पात्रांच्या असून बोलीभाषेतील संवाद असलेल्या कथा विनोदी असल्या तरी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या आहेत.”' थर्ड डिग्री ' या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा शिवाजीराव बागल म्हणाले “ कथासंग्रहातील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या धाटणीच्या प्रेरणात्मक आणि बोधात्मक कथांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न कथाकार दादासाहेब खरात यांनी कथासंग्रहाच्या माध्यमातून केलेला आहे. ”
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या प्रकाशन समारंभापूर्वी येथील गझलकार व कवी सचिन कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कवी राजेंद्र झुंबर भोसले, सुजीतकुमार कांबळे, रावसाहेब साठे, आबासाहेब देशमुख, किरण घोडके तसेच कवयित्री संगीताताई मासाळ, योगीणीताई ताठे, शितलताई गाजरे आणि शुभांगीताई गाजरे या निमंत्रित कवी कवयित्रींचे बहारदार कवी संमेलन पार पडले. यावेळी सर्व रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
साहित्य वर्तुळ, पंढरपूर आणि योगेश खरात मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन समारंभासाठी पंढरपूर आणि परिसरातील अंकुश गाजरे, सुरेश मोहिते, आण्णासाहेब लोखंडे, ग्रामसेवक नवले, जाधव सर, झरे सर हे मान्यवर उपस्थित होते.
या समारंभाचे प्रास्ताविक साहित्य वर्तुळचे सर्वेसर्वा कवी रवि वसंत सोनार यांनी केले. सुत्रसंचलन एस.आर.कुलकर्णी यांनी केले. तर प्रसिद्ध हायकूकार राजेंद्र झुंबर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कौलगे, शैलेश खरात, योगेश खरात, सुशांत मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments