खळबळजनक- साईबाबाच्या शिर्डीत 88 लोक अचानक गायब, महिलांचा जास्त समावेश; कोर्टाने व्यक्त केली मानवी तस्करीची शंका


Pandharpur Live : साईबाबा च्या शिर्डीतून एका वर्षात तब्बल 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांपैकी काही लोक सापडले आहे, मात्र बाकीचे अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतेक स्त्रिया असून, शिर्डी येथे दर्शनासाठी आल्यानंतर त्या गायब झाल्या आहेत. या गंभीर गोष्टीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने, पोलिसांना या प्रकरणात मानवी किंवा मानवी अवयव तस्करीच्या (Human Trafficking) दृष्टीकोनातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती टीव्ही नलावडे आणि एसएम गव्हाणे यांच्या खंडपीठाने, गेल्या महिन्यात मनोज कुमार यांच्या वतीने सन 2018 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मागच्या महिन्यात हा आदेश दिला होता.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................
2017 मध्ये मनोजची पत्नी शिर्डी येथून बेपत्ता झाली होती. अशीच अनेक प्रकाराने समोर आली आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, एका वर्षात 88 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. त्यातील बहुतेक स्त्रिया आहेत. एखादा गरीब जेव्हा बेपत्ता होतो, तेव्हा त्याचे कुटुंब असहाय्य होते. बहुतेक लोक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत आणि कोर्टापर्यंत ही प्रकरणे पोहचत नाहीत. म्हणूनच शिर्डीमधील या प्रकरणाबाबत मानव आणि मानवी अवयव तस्करीच्या दृष्टीकोनातून पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना विशेष युनिट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. देशभरातून येथे विविध समाजातील, जाती पंथातील लोक इथे दर्शनासाठी येतात. शिर्डी हे देशातील एक सर्वात समृद्ध मंदिर आहे, परदेशातूनही हजारो भक्त इथे येतात. मात्र इथून 88 लोक गायब झाल्याने भाविकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments