सोशल मीडियाच्या तर त्या नायिका झाल्या. मात्र काही महिने लोटल्यानंतर आता परिस्थिती पुन्हा पालटली असून राणू मंडल यांच्या नशीबात पुन्हा जुने दिवस आले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात दोन वेळेचे जेवण मिळणेही राणू मंडल यांच्यासाठी कठीण झाले आहे. त्यांना कधीतरी एक वेळचे जेवण मिळते, त्यातही फक्त भात मिळत असल्याचे समोर आले आहे.
आसपासच्या लोकांनी काही दिले तरच त्यांना अन्न मिळत आहे.
रेल्वे स्टेशनवर गाण गाणाऱ्या राणू यांच्या एका व्हिडिओमुळे त्यांचे आयुष्य़ बदलले खरे, परंतु आता त्याच राणू मंडल यांच्यावर ही वेळ ओढावल्याची परिस्थिती आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये राणू मंडल यांना संधी दिली. आणि राणू मंडल यांनी गायलेली इतर गाणीही लोकप्रिय झाली. मात्र ही लोकप्रियता आणि यश हे राणू यांच्यासाठी क्षणिकच ठरले आहे.


0 Comments