ऊसदर आंदोलन पेटले; पुण्याच्या साखर आयुक्त संकुलात तोडफोड राजु शेट्टींसह स्वाभिमानीच्या 500 कार्यकर्त्यांना अटक

पंढरपूर लाईव्ह

दि. 12 जानेवारी 2015

* पुण्याच्या साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन...

* साखर आयुक्त कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोड फोड...

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, दत्ता पाटील, विठ्ठल आबा, गणेश साळुंखे, जगदीश पाटील, जयेश महाडिक यांच्यासह 500 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

* राजु शेट्टी यांच्या अटकेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पेटविली साखर आयुक्तांची गाडी.


पुणे दि.12 जानेवारी 2015
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील साखर आयुक्त संकुलात संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ऊसउत्पादक शेतकर्‍यांना एफआरपी नुसार ऊसदर मिळावा या मागणी साठी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी कांही कार्यकर्त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर
राजुशेट्टींसह 500 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी साखर संकुल इमारतीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, कांही गाड्या पेटवण्यात आल्या. साखर आयुक्तांची  गाडी सुध्दा पेटविण्यात आली. या आंदोलनादरम्यान बर्‍याच कालावधीनंतर स्वाभिमानीच्या तीव्र आंदोलनाचे दर्शन घडले. मात्र ‘स्वाभिमानीचे नेते कुठे आहेत..?’ हा प्रश्‍न विचारणारांना आज याचे उत्तर नक्कीच मिळाले असेल...

वेगळा विचार करावा लागेल-राजु शेट्टी

याबाबत बोलताना स्वाभिमानीचे नेते राजु शेट्टी यांनी आपली भुमीका मांडताना सांगितले की, प्रशासन साखर कारखानदारांना सामील झालेले असून ऊसदराच्या प्रश्‍नाबाबत चाल-ढकल करत आहे. राज्यात आपल्या मित्रपक्षांचे सरकार आहे  मात्र तरीही यावर तोडगा निघत नाही. याबाबत लवकरच वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

एफआरपी नुसारच दर देणार- सहकारमंत्री चंद्रकांत पाटील

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या ऊसाचा दर हा एफआरपी नुसारच देण्यात येणार आहे. याबाबत शासन आग्रही आहे. मात्र यासाठीच्या कांही प्रोसेस असतात. त्यासाठी थोडा वेळ
लागेल. अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकारी मालमत्तेचं नुकसान करु नये असेही ते म्हणाले.

राज्य व केंद्र सरकारने शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत- शरद पवार

कारखान्यांकडे पैसे नसतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पुढाकार घेवून शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची सद्यस्थितीत गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले आहे.
....................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  41,719  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2452 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................


Post a Comment

0 Comments