
स्पर्धेचे, मैदानाचे व खेळ स्पर्धा पताक्याचे उदघाटन राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र खो खो संघाचा कर्णधार सागर लेंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी पुणे विभाग एम.एस.बी.टी.ई. सी झोन अंतर्गत सोलापूर व सातारा जिल्ह्यातील डिप्लोमा पोलिटेक्निक महाविध्यालयातील संघ व्यवस्थापकांच्या साक्षीनेच खेळाचे लाँटस पाडण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू लेंगरे यांनी आपल्या ग्रामीण भागातील खेळापासून ते थेट महाराष्ट्र संघात कर्णधार होण्यापर्यंतची खडतर वाटचाल सांगितली.पुढे बोलताना उपाध्यक्ष दत्तू म्हणाले क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास त्याचा फायदा पुढे स्पर्धा परीक्षा,पोलीस विभाग,मिलिटरी, अशा प्रशासकीय सेवेत होतो. अश्या राष्ट्रीय खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात येते. तसेच प्रत्येक खेळाडूंनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी. कारण खेळात प्रामाणिक राहिल्यास आपले यश कोणीच हिरावून घेवू शकत नाही. तसेच या ठिकाणी राष्ट्रीय पंच असल्यामुळे कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही. याची खात्री आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी(पदवी)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खेळाडूंनी विजयी झाल्यानतर त्याचा जास्त अतिरेकी विजय साजरा न करता पराभूत संघालाही तेवढ्याच आत्मीयतेने धीर दिला पाहिजे.तसेच पराभूत संघाने देखील आपले मनोध्येर्य मनोध्येर्य खचू न देता खिलाडीवृत्ती जोपासून पुढच्या वेळी याची भरपाई खेळामधूनच करण्याची तयारी केली पाहिजे. पराभूत होवून देखील आपल्या खिलाडीवृत्तीमुळे तो खेळ दिर्घकाळ स्मरणात रहातो.’ सर्व स्पर्धकांना अक्षय नागणे यांनी खेळातील आचारसंहिते विषयी यांनी शपथ दिली.

छायाचित्र- 1.श्री विठ्ठल डिप्लोमा पोलिटेक्निक इंजिनिअरिंग मध्ये एम.एस.बी.टी.ई.अंतर्गत खो खो व कब्बडी स्पर्धेचे उदघाटन करताना राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र खो खो संघाचा कर्णधार सागर लेंगरे सोबत डॉ. रोंगे, प्राचार्य मिसाळ, सोलापूर जिल्हा खो खो असोशियशनचे उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू, मार्गदर्शक जोड्मोटे, कबड्डीचे पंच क्षीरसागर आदी 2. खो खो मध्ये एका खेळाडूला बाद करतानाचे चुरसीचा क्षण.
0 Comments