मध्यावधी बदल्या करतांना कायद्याचे योग्य पालन करण्याचे शासनाचे निर्देश

पंढरपूर लाईव्ह:-

दि. 12 फेब्रुवारी, 2015

मुंबई, दि. 12 : मध्यावधी बदल्या करतांना बदली कायद्यातील तरतुदींचे व्यवस्थीत पालन करावे असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.  एखाद्या प्रकरणात तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचार्‍याच्या विरोधात गैरवर्तणूकीची तक्रार असल्यास आणि तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित कर्मचार्‍याला त्याच पदावर ठेवून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचा निर्णय घ्यावा. मात्र त्या कर्मचार्‍याला या पदावर ठेवणे योग्य नाही असे जर प्राधिकार्‍याचे  मत झाल्यास त्याबाबतची योग्य कारणीमिमांसा करुन त्याची बदली वरिष्ठ अधिकार्‍याकडे  अशा बदल्या करतांना काही वेळा गैरवर्तणूकीचे कारण किंवा अपरिहार्य परिस्थिती असे कारण दाखवून बदली केली जाते. मात्र या बदलीची खरोखरच आवश्यकता आहे का ही बाब तपासली जात नाही. त्यामुळे आता शासनाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.


तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याखेरीज संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्‍याची
बदली प्रस्तावित करु नये. अशा बदल्या वर्षातून केवळ एप्रिल व मे महिन्यामध्येच कराव्यात.
तीन वर्षाचा कालावधी पूर्ण नसलेल्या कर्मचार्‍याची बदली करावयाची असल्यास विशिष्ट कारण नमुद करणे आणि आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याची सहमती घेणे आवश्यक आहे.

एखाद्या कर्मचार्‍याने विशिष्ट पदाची मागणी केल्यास किंवा त्याने लोकप्रतिनीधीमार्फत ते पद मागितल्यास या विशिष्ट पदावर काम करणारा कर्मचारी जर तीन वर्षापेक्षा कमी काळ या पदावर असेल तर त्याची बदली करु नये. हे पद मागणार्‍या कर्मचार्‍याची पदस्थापना लोकप्रतिनीधीमार्फत एखाद्या विशिष्ट पदाच्या मागणी करण्याकरिता बदली प्राधिकार्‍यावर दबाव टाकण्यात येत असल्यास संबंधित कर्मचार्‍याच्या विरोधात आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. सर्व प्रशासकीय विभागाने पदस्थापना आणि बदल्यांच्या बाबतीत मागणी सेवा

000

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 14 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 53 हजार 449  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 889 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments