कॉ. गोविंदराव पानसरे झुंज अखेर संपली. शोषित, वंचित, उपेक्षित कामगार, कष्टकरी वर्गासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले.

पंढरपूर लाईव्ह

महाराष्ट्रातील कष्टकरी वर्गाचे नेते आणि डाव्या चळवळीचे पितामह कॉ. गोविंदराव
पानसरे ( ८२) यांची गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर शुक्रवारी संपली. कोल्हापूर येथे अज्ञात हल्लखोरांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले पानसरे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रात्री नऊच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आयुष्यभर विवेकाने विचारांची लढाई लढणारा लढवय्या काळाच्या पडद्याआड गेल्याने पुरोगामी चळवळीतून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, प्रतिगामी शक्तींनी दाभोलकरांनंतर झालेल्या पानसरेंच्या खुनामुळे संतापाचे वातावरण आहे.


कॉ. गोविंदराव पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोल्हापुरातील अॅस्टर आधार हॉस्पिटलात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. पुढील उपचारासाठी शुक्रवारी संध्याकाळी त्यांना कोल्हापूरहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास त्यांना फुफ्फुसात रक्तस्राव झाला. त्यानंतर रक्ताची उलटी झाली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. प्रकाश रेड्डी यांनी दिली.

नगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार गावात पानसरे यांचा जन्म झाला. तरुण वयात राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेले पानसरे नंतर कम्युनिस्ट चळवळीकडे वळले. शोषित, वंचित, उपेक्षित कामगार, कष्टकरी वर्गासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. 



मुद्दयाचे उत्तर जेंव्हा मुद्दयाने देता येत नाही तेंव्हा नालायक लोक गुद्द्यावर येतात... आणि असा भ्याड हल्ला करतात.... असाच हल्ला... काॅम्रेड पानसरेंवर झाला... 3 दिवस झाले हल्लेखोर अदयाप सापडले नाहीत... असे का? काय चालले आहे महाराष्ट्रात? आमच्या महाराष्ट्राचे पुरोगामीत्व संपवण्याचे कुटील कारस्थान रचले जातेय का? कम्युनिष्ठ पक्षाचे 22 वे अधिवेशन होणार होते कोल्हापूरात.... कोल्हापुरातून होणारा यल्गार थोपवण्यासाठीच हा भ्याड हल्ला केलाय का? एखादया राजकारण्यावर जर असा हल्ला झाला असता तर मारेकरी लगेच सापडले असते की नाही?.... गोरगरीबांचे नेतृत्व करणारे काॅम्रेड पानसरे यांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही... जनता तसे होऊ देणारच नाही..... जातीयवादी लोक आणि विकृत मानसिकतेचा जाहिर निषेध.... कामगारांचे आणि शोषितांचे प्रश्न सोडवणा-या या लढवय्या जन नायकाला ।।भावपुर्ण श्रध्दांजली।।


-भगवान गणपतराव वानखेडे


पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 20  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 55 हजार 810  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 161 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments