पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट 2018

आटपाडी / खरसुंडी (प्रतिनिधी ) श्री. सिद्धनाथ नगरी खरसुंडीला शंभर कोटी रूपयेच्या विशेष विकास आराखडयाद्वारे राजाश्रय देत विशेष वर्ग *राज* नाथ नगरी बनवा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी शासनाकडे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यंमत्री ना. देवेंद्र फडणवीस , उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि आटपाडीचे सुपुत्र ना . राम नाईक , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचे या विषयी त्यांनी लक्ष वेधले आहे.
सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी येथे श्री .सिद्धनाथांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे . प्रत्येक रविवार , पोर्णीमा , नवरात्र , नाथ जन्मकाळ, श्री. जकाई यात्रा, पौष आणि चैत्र महिन्यात भरणाऱ्या मोठया यात्रांसह देशभरातुन वर्षभर १० लाखापेक्षा जास्त भावीक भक्त या तीर्थक्षेत्री ये -जा करतात . लहान - मोठया खिलार जनावरांच्या खरेदी विक्री उलाढालीच्या निमित्ताने येथील जनावरांच्या यात्रांमध्ये लाखो शेतकऱ्यांची खरसुंडी कडे ये - जा होत असते . तथापि खरसुंडी येणारे आठ मुख्य रस्ते अरूंद आणि दुरावस्थेत आहेत . १ ) नेलकरंजी - खरसुंडी रस्ता २ ) झरे- खरसुंडी रस्ता ३ ) आटपाडी - खरसुंडी काळा पट्टा मार्गे ४ ) आटपाडी -खरसुंडी तडवळे मार्गे ५ ) विटा -खरसुंडी वलवण मार्गे ६ ) बलवडी - खरसुंडी ७ ) आटपाडी -खरसुंडी कामथ मार्गे ८ ) करगणी -खरसुंडी बाळेवाडी मार्गे . हे आठ मार्ग दोन पदरी म्हणजे १०० फुटी केले पाहिजेत . खरसुंडीतील सर्व अंतर्गत रस्ते प्रशस्त बनविले पाहिजेत . नाथमंदिर ते बसस्थानक पर्यतच्या मुख्य पेठेचा रस्ता सासन काठी सोहळ्याच्या दरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून प्रशस्तच केला गेला पाहीजे . नाथ मंदिर मागच्या अडगळीच्या ठिकाणच्या स्वच्छता संकुलातील शौचालये , स्नानगृहे जवळ रहात असलेल्या कर्मचाऱ्याच्या वास्तव्याने प्रायव्हशीच्या अभावी भावीक भक्तांकडून उपयोगातच आणल्या जात नाहीत . अन्य काही ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत . शासकीय विश्रांतीगृहाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झाली आहे .दारूडे , जुगारी , प्रेमी युगलांचे आश्रयस्थान बनलेल्या या रेस्ट हाऊसची दारे खिडक्या काढून नेण्यापर्यत काहींची मजल गेली आहे . खरसुंडीच्या चार ही दिशांना , बसस्थानक परिसरात सुलभ शौचालय , स्नानगृह आणि भक्तांना राहण्यासाठीची पुरेशी व्यवस्था नसल्याने भावीकांची मोठी कुचंबना होत असते .आपलेच वावर समजून जीव मोकळा करणारे येथे शेकडो पुरुष आढळतील . तथापि माता , भगिनी , लहान मुलांचे मोठे हाल होतात. बसस्थानक परिसर आणि गावच्या चारही दिशेला पुरूषांसाठी दहा - दहा आणि महिलांसाठी दहा -दहा शौचालये , स्नानगृहे , बांधली गेली पाहीजेत . किमान ५०० भक्तांना सहकुटूंब राहता यावे असे चार वेगवेगळ्या ठिकाणी सुसज्ज असे भक्त निवास बांधले गेले पाहीजे . किमान आठ वेगवेगळ्या ठिकाणी पे- पार्कींग व्यवस्थेद्वारे दुचाकी , चार चाकी वाहनांचे वाहनतळ , पार्कींग स्टॅड उभारली पाहीजेत ,याकडे सादिक खाटीक यांनी मान्यवरांचे लक्ष वेधले आहे . नाथ मंदिर परिसरातच सी . सी. टी.व्ही. कॅमेरे आहेत . संपूर्ण नाथ नगरी सी.सी. टी.व्ही . कॅमेऱ्यांच्या कक्षेत येण्यासाठी पावले टाकली गेली पाहीजेत . सासन काठी आणि पालखी मिरवणूक सोहळ्याच्या यात्रा काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीतल्या चेंगराचेंगरी आणि उधळलेले नवसाचे नारळ , खोबरे लागून गेल्या वर्षी ७१ लोक जखमी झाले होते . चेंगराचेंगरीत एकाचा झालेला मृत्यू *देवाच्या दारात मरण आले* हे भाग्याचे समजून नातलगांनी त्याची नोंद न केल्याने सदरचा प्रकार चव्हाट्यावर आला नव्हता. ही घटनाही गत वर्षाचीच आहे . तर भांगेतून झालेल्या विषबाधेने ४५ जणांना काही दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे लागले होते . हा प्रकारही दोन वर्षापूर्वीचा आहे .
खरसुंडी गावास होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शुध्द असतो का ? तसेच मंदिराच्या आवारात मिळणारे पाणी शुध्द असते का ? हे ही पाहणे महत्वाचे आहे . पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तांच्या निवासाच्या २५० खोल्या आणि जलशुध्दीकरण प्लँट साठी मंजूर झालेले जवळपास ३ कोटी रूपये जागा उपलब्ध न झाल्याने परत गेल्याचे सांगीतले जाते , याची काळजी ना ग्रामपंचायतीला , ना देवस्थान कमेटीला , ना राज्यकर्त्या नेतेमंडळीना ., अशी स्थिती असल्याचे नागरीक बोलतात. खरसुंडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्यावेळी गावामध्ये ८१ जागा शासकीय होत्या असे बोलले जाते . काही अपवाद वगळता या सर्व जागांवर अतिक्रमण केले गेल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे . अनेक धनदांडगे , जात दांडग्याच्या ताब्यात या जागा असल्याने शासनही त्यांचे काही करू शकत नसल्याने विविध विकास कामांसाठी येणारे करोडो रुपये जागेअभावी परत जात असतील तर ते भुषणावह नाही . खरसुंडीतील सर्व अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून या मोकळ्या होणाऱ्या जागांचा भावीक भक्तांच्या सोयी सुविधा करणेसाठी वापर केला गेला पाहीजे . देवस्थान लगतच असलेल्या देवाच्या बागेचा अंदाजे २ एकर जागेचा आणि चिंचाळे , घानंद रोड लगतच्या सिमोल्लंगन माळाच्या अंदाजे २० एकर जागेचा उपयोग नाथ नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी केला गेला पाहीजे, अशी लोकभावना आहे .आमदार जयंतराव पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात खरसुंडीसाठी उपलब्ध करून दिलेल्या २० लाखाच्या निधीतून पेठेतला रस्ता, बलवडी रोड कडेची पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली गेली . त्यानंतर मात्र खरसुंडीसाठी भरीव निधी आल्याचे ऐकीवात नाही . खरसुंडी कडे येणाऱ्या आठही रस्त्यावर दर ३ किलोमीटरवर दिशादर्शक फलक लावणे ही काळाची गरज आहे . श्री . सिध्दनाथ देवस्थान व परिसराची महती व माहीती देणारी स्वतंत्र वेबसाईट तयार केली गेली पाहीजे .
संपूर्ण गावात पाणी वाहून जातील अशा बंदिस्त , भुयारी गटारी तसेच संपूर्ण गावात लख्ख प्रकाश देणारे पथदिवे , गोरगरीबांना अल्प मोबदल्यात रोटी , कपडा , धान्य उपलब्ध करून देणाऱ्या मानवतेच्या बँकाही नाथनगरीची महती वाढविणाऱ्या ठरल्या पाहीजेत . जेनेरीक मेडीशीनची स्वस्त औषधी दुकाने आणि उपजिल्हा रुग्णालय खरसुंडीत झाले पाहीजे ,असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी नाथ नगरीच्या चौफेर , सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष विकास आराखडयातून शंभर कोटी रुपये खर्चल्यास होणाऱ्या विकासाच्या जोरावर आणि भावीक भक्तांकडून येणाऱ्या देणग्यामधून ही रक्कम पाच - दहा वर्षात शासनाला परत मिळविता येवू शकेल . त्यासाठीची पारदर्शकता शासनाने निर्माण केली पाहिजे . खरसुंडी नगरीच्या चौफेर विकासासाठी राज्य शासनाने १०० कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून द्यावेत असे मुख्यमंत्री महोदयांना साकडे घातले आहे
सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी येथे श्री .सिद्धनाथांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे . प्रत्येक रविवार , पोर्णीमा , नवरात्र , नाथ जन्मकाळ, श्री. जकाई यात्रा, पौष आणि चैत्र महिन्यात भरणाऱ्या मोठया यात्रांसह देशभरातुन वर्षभर १० लाखापेक्षा जास्त भावीक भक्त या तीर्थक्षेत्री ये -जा करतात . लहान - मोठया खिलार जनावरांच्या खरेदी विक्री उलाढालीच्या निमित्ताने येथील जनावरांच्या यात्रांमध्ये लाखो शेतकऱ्यांची खरसुंडी कडे ये - जा होत असते . तथापि खरसुंडी येणारे आठ मुख्य रस्ते अरूंद आणि दुरावस्थेत आहेत . १ ) नेलकरंजी - खरसुंडी रस्ता २ ) झरे- खरसुंडी रस्ता ३ ) आटपाडी - खरसुंडी काळा पट्टा मार्गे ४ ) आटपाडी -खरसुंडी तडवळे मार्गे ५ ) विटा -खरसुंडी वलवण मार्गे ६ ) बलवडी - खरसुंडी ७ ) आटपाडी -खरसुंडी कामथ मार्गे ८ ) करगणी -खरसुंडी बाळेवाडी मार्गे . हे आठ मार्ग दोन पदरी म्हणजे १०० फुटी केले पाहिजेत . खरसुंडीतील सर्व अंतर्गत रस्ते प्रशस्त बनविले पाहिजेत . नाथमंदिर ते बसस्थानक पर्यतच्या मुख्य पेठेचा रस्ता सासन काठी सोहळ्याच्या दरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून प्रशस्तच केला गेला पाहीजे . नाथ मंदिर मागच्या अडगळीच्या ठिकाणच्या स्वच्छता संकुलातील शौचालये , स्नानगृहे जवळ रहात असलेल्या कर्मचाऱ्याच्या वास्तव्याने प्रायव्हशीच्या अभावी भावीक भक्तांकडून उपयोगातच आणल्या जात नाहीत . अन्य काही ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत . शासकीय विश्रांतीगृहाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झाली आहे .दारूडे , जुगारी , प्रेमी युगलांचे आश्रयस्थान बनलेल्या या रेस्ट हाऊसची दारे खिडक्या काढून नेण्यापर्यत काहींची मजल गेली आहे . खरसुंडीच्या चार ही दिशांना , बसस्थानक परिसरात सुलभ शौचालय , स्नानगृह आणि भक्तांना राहण्यासाठीची पुरेशी व्यवस्था नसल्याने भावीकांची मोठी कुचंबना होत असते .आपलेच वावर समजून जीव मोकळा करणारे येथे शेकडो पुरुष आढळतील . तथापि माता , भगिनी , लहान मुलांचे मोठे हाल होतात. बसस्थानक परिसर आणि गावच्या चारही दिशेला पुरूषांसाठी दहा - दहा आणि महिलांसाठी दहा -दहा शौचालये , स्नानगृहे , बांधली गेली पाहीजेत . किमान ५०० भक्तांना सहकुटूंब राहता यावे असे चार वेगवेगळ्या ठिकाणी सुसज्ज असे भक्त निवास बांधले गेले पाहीजे . किमान आठ वेगवेगळ्या ठिकाणी पे- पार्कींग व्यवस्थेद्वारे दुचाकी , चार चाकी वाहनांचे वाहनतळ , पार्कींग स्टॅड उभारली पाहीजेत ,याकडे सादिक खाटीक यांनी मान्यवरांचे लक्ष वेधले आहे . नाथ मंदिर परिसरातच सी . सी. टी.व्ही. कॅमेरे आहेत . संपूर्ण नाथ नगरी सी.सी. टी.व्ही . कॅमेऱ्यांच्या कक्षेत येण्यासाठी पावले टाकली गेली पाहीजेत . सासन काठी आणि पालखी मिरवणूक सोहळ्याच्या यात्रा काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीतल्या चेंगराचेंगरी आणि उधळलेले नवसाचे नारळ , खोबरे लागून गेल्या वर्षी ७१ लोक जखमी झाले होते . चेंगराचेंगरीत एकाचा झालेला मृत्यू *देवाच्या दारात मरण आले* हे भाग्याचे समजून नातलगांनी त्याची नोंद न केल्याने सदरचा प्रकार चव्हाट्यावर आला नव्हता. ही घटनाही गत वर्षाचीच आहे . तर भांगेतून झालेल्या विषबाधेने ४५ जणांना काही दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे लागले होते . हा प्रकारही दोन वर्षापूर्वीचा आहे .
खरसुंडी गावास होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शुध्द असतो का ? तसेच मंदिराच्या आवारात मिळणारे पाणी शुध्द असते का ? हे ही पाहणे महत्वाचे आहे . पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तांच्या निवासाच्या २५० खोल्या आणि जलशुध्दीकरण प्लँट साठी मंजूर झालेले जवळपास ३ कोटी रूपये जागा उपलब्ध न झाल्याने परत गेल्याचे सांगीतले जाते , याची काळजी ना ग्रामपंचायतीला , ना देवस्थान कमेटीला , ना राज्यकर्त्या नेतेमंडळीना ., अशी स्थिती असल्याचे नागरीक बोलतात. खरसुंडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्यावेळी गावामध्ये ८१ जागा शासकीय होत्या असे बोलले जाते . काही अपवाद वगळता या सर्व जागांवर अतिक्रमण केले गेल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे . अनेक धनदांडगे , जात दांडग्याच्या ताब्यात या जागा असल्याने शासनही त्यांचे काही करू शकत नसल्याने विविध विकास कामांसाठी येणारे करोडो रुपये जागेअभावी परत जात असतील तर ते भुषणावह नाही . खरसुंडीतील सर्व अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून या मोकळ्या होणाऱ्या जागांचा भावीक भक्तांच्या सोयी सुविधा करणेसाठी वापर केला गेला पाहीजे . देवस्थान लगतच असलेल्या देवाच्या बागेचा अंदाजे २ एकर जागेचा आणि चिंचाळे , घानंद रोड लगतच्या सिमोल्लंगन माळाच्या अंदाजे २० एकर जागेचा उपयोग नाथ नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी केला गेला पाहीजे, अशी लोकभावना आहे .आमदार जयंतराव पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात खरसुंडीसाठी उपलब्ध करून दिलेल्या २० लाखाच्या निधीतून पेठेतला रस्ता, बलवडी रोड कडेची पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली गेली . त्यानंतर मात्र खरसुंडीसाठी भरीव निधी आल्याचे ऐकीवात नाही . खरसुंडी कडे येणाऱ्या आठही रस्त्यावर दर ३ किलोमीटरवर दिशादर्शक फलक लावणे ही काळाची गरज आहे . श्री . सिध्दनाथ देवस्थान व परिसराची महती व माहीती देणारी स्वतंत्र वेबसाईट तयार केली गेली पाहीजे .
संपूर्ण गावात पाणी वाहून जातील अशा बंदिस्त , भुयारी गटारी तसेच संपूर्ण गावात लख्ख प्रकाश देणारे पथदिवे , गोरगरीबांना अल्प मोबदल्यात रोटी , कपडा , धान्य उपलब्ध करून देणाऱ्या मानवतेच्या बँकाही नाथनगरीची महती वाढविणाऱ्या ठरल्या पाहीजेत . जेनेरीक मेडीशीनची स्वस्त औषधी दुकाने आणि उपजिल्हा रुग्णालय खरसुंडीत झाले पाहीजे ,असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी नाथ नगरीच्या चौफेर , सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष विकास आराखडयातून शंभर कोटी रुपये खर्चल्यास होणाऱ्या विकासाच्या जोरावर आणि भावीक भक्तांकडून येणाऱ्या देणग्यामधून ही रक्कम पाच - दहा वर्षात शासनाला परत मिळविता येवू शकेल . त्यासाठीची पारदर्शकता शासनाने निर्माण केली पाहिजे . खरसुंडी नगरीच्या चौफेर विकासासाठी राज्य शासनाने १०० कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून द्यावेत असे मुख्यमंत्री महोदयांना साकडे घातले आहे
खरसुंडी गावास होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शुध्द असतो का ? तसेच मंदिराच्या आवारात मिळणारे पाणी शुध्द असते का ? हे ही पाहणे महत्वाचे आहे . पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तांच्या निवासाच्या २५० खोल्या आणि जलशुध्दीकरण प्लँट साठी मंजूर झालेले जवळपास ३ कोटी रूपये जागा उपलब्ध न झाल्याने परत गेल्याचे सांगीतले जाते , याची काळजी ना ग्रामपंचायतीला , ना देवस्थान कमेटीला , ना राज्यकर्त्या नेतेमंडळीना ., अशी स्थिती असल्याचे नागरीक बोलतात. खरसुंडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्यावेळी गावामध्ये ८१ जागा शासकीय होत्या असे बोलले जाते . काही अपवाद वगळता या सर्व जागांवर अतिक्रमण केले गेल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे . अनेक धनदांडगे , जात दांडग्याच्या ताब्यात या जागा असल्याने शासनही त्यांचे काही करू शकत नसल्याने विविध विकास कामांसाठी येणारे करोडो रुपये जागेअभावी परत जात असतील तर ते भुषणावह नाही . खरसुंडीतील सर्व अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून या मोकळ्या होणाऱ्या जागांचा भावीक भक्तांच्या सोयी सुविधा करणेसाठी वापर केला गेला पाहीजे . देवस्थान लगतच असलेल्या देवाच्या बागेचा अंदाजे २ एकर जागेचा आणि चिंचाळे , घानंद रोड लगतच्या सिमोल्लंगन माळाच्या अंदाजे २० एकर जागेचा उपयोग नाथ नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी केला गेला पाहीजे, अशी लोकभावना आहे .आमदार जयंतराव पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात खरसुंडीसाठी उपलब्ध करून दिलेल्या २० लाखाच्या निधीतून पेठेतला रस्ता, बलवडी रोड कडेची पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली गेली . त्यानंतर मात्र खरसुंडीसाठी भरीव निधी आल्याचे ऐकीवात नाही . खरसुंडी कडे येणाऱ्या आठही रस्त्यावर दर ३ किलोमीटरवर दिशादर्शक फलक लावणे ही काळाची गरज आहे . श्री . सिध्दनाथ देवस्थान व परिसराची महती व माहीती देणारी स्वतंत्र वेबसाईट तयार केली गेली पाहीजे .
संपूर्ण गावात पाणी वाहून जातील अशा बंदिस्त , भुयारी गटारी तसेच संपूर्ण गावात लख्ख प्रकाश देणारे पथदिवे , गोरगरीबांना अल्प मोबदल्यात रोटी , कपडा , धान्य उपलब्ध करून देणाऱ्या मानवतेच्या बँकाही नाथनगरीची महती वाढविणाऱ्या ठरल्या पाहीजेत . जेनेरीक मेडीशीनची स्वस्त औषधी दुकाने आणि उपजिल्हा रुग्णालय खरसुंडीत झाले पाहीजे ,असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी नाथ नगरीच्या चौफेर , सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष विकास आराखडयातून शंभर कोटी रुपये खर्चल्यास होणाऱ्या विकासाच्या जोरावर आणि भावीक भक्तांकडून येणाऱ्या देणग्यामधून ही रक्कम पाच - दहा वर्षात शासनाला परत मिळविता येवू शकेल . त्यासाठीची पारदर्शकता शासनाने निर्माण केली पाहिजे . खरसुंडी नगरीच्या चौफेर विकासासाठी राज्य शासनाने १०० कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून द्यावेत असे मुख्यमंत्री महोदयांना साकडे घातले आहे
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments