विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधात आणि मोठ्या गोंधळात केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. या सोबतच गृहमंत्री शहा यांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला. कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा गृहमंत्री शहा यांनी राज्यसभेत केली.
नवी दिल्ली: विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधात आणि मोठ्या गोंधळात केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. या सोबतच गृहमंत्री शहा यांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला. कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा गृहमंत्री शहा यांनी राज्यसभेत केली.
______________________
गृहमंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यसभेत येत हा प्रस्ताव सादर केला. या वेळी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अमित शहांना जोरदार विरोध दर्शवला. केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार, हे दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याला लाभलेला स्वायत्त राज्याचा दर्जा संपुष्टात येणार आहे. या बरोबरच जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणूक करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. शिवाय राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे.
_____________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सरकारच्या वतीने जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक सादर केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना विधेयक सादर करण्याची सूचना केली. या वेळी विरोध करणाऱ्या काँग्रेसचे सदस्य गुलामनबी आझाद यांनी काश्मिरी नेत्यांच्या नजरकैदेला कडाडून विरोध दर्शवला. आझाद यांनी नजरकैदेबाबतची स्थिती सरकारने स्पष्ट करावी अशी जोरदार मागणी केली. सरकारने सादर केलेली सर्व विधेयके आम्ही मंजूर करू, मात्र सर्वप्रथम काश्मीरबाबत निवेदन करावे अशी मागणी या वेळी आझाद यांनी केली.
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________






0 Comments