ठाकरे सरकार- विश्वासदर्शक ठराव मंजूर... छत्रपती शिवाजी महाराज व आई-वडिलांची शपथ घेणं हा जर गुन्हा असेल तर तो मी सातत्याने तो करेल - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे



पंढरपूर Live : अनेक दिवसाच्या सत्तासंघर्षानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यानिमित्ताने महाविकासआघाडीने शक्तिप्रदर्शनही केले. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सरकारला १६९ आमदारांनी सभागृहात समर्थन दर्शवल्याने उद्धव ठाकरे सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ही घोषणा केली. महाविकास आघाडीने १७० पेक्षा अधिक आमदारांच्या समर्थनाचा दावा केला होता. ज्यात या नव्या आघाडीला १६९ आमदारांनी आपले समर्थन देत महाविकास आघाडीला बहुमत दिले.


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, असा प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. यास अनुमोदन नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले.
मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांनी जोरदार हंगामा केला.

विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाषण केले. ते म्हणाले की, सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभारी आहे. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार मानतो ज्यांच्यामुळे मी इथे आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे. त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा जर गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
तसेच मी मैदानातला माणूस आहे. सभागृहात कसं होईल याची मला चिंता होती. पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपाने घातलेल्या गोंधळावर टीका केली. मी समोरा-समोर लढणारा आहे. शत्रूला अंगावर देखील घेणार आहे, असेही ते म्हणाले.


दरम्यान अधिवेशनेच्या सुरवातीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. 27 नोव्हेंबरला अधिवेशन हे संस्थगित करण्यात आलं होत. त्यामुळे आता पुन्हा अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असते. मात्र या अधिवेशनाचा समन्स काढलेला नाही. त्यामुळे हे अधिवेशन कायद्याच्या तरतुदीला धरून नाही, असा आक्षेप घेत देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकार्यांनी सभात्याग केला.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments