अतिरिक्त सुखाच्या अपेक्षेने मानवी जीवनात तणाव – सौ. रेश्मा कारखानीस

Pandharpur Live -  पंढरपूर – “सुखाची व यशाची अपेक्षा ही माणसाच्या जीवनात तणाव निर्माण करते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तीक समस्यांनी मानवी जीवनात अतिरिक्त ताण निर्माण होतो. अशा ताण-तणावाचे माणसांनी वेळेत नियोजन केले पाहिजे. तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी अपेक्षांचे ओझे कमी केल्यास माणूस आनंदी राहू शकतो. सध्याची परिस्थिती ही अतिशय वेगवान आहे. हा वेग पकडताना आपली धावाधाव होते. परिणामी तणावात वाढ होते. तणावग्रस्त मन शरीरात विविध आजार निर्माण करते. अशा आजाराचे नियंत्रण करण्यासाठी मनावर उपचार करणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन मुंबई येथील मनशक्ती केंद्राच्या साधक सौ. रेश्मा कारखानीस यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘तणावमुक्ती’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विकास कदम हे होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक, उपप्राचार्य ए. एस. चंदनशिवे व प्रोफेसर डॉ. एस. व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

रेश्मा कारखानीस पुढे म्हणाल्या की, “अतिहव्यास ही बाब तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. या तणावातून मुक्त होण्यासाठी ज्ञान व ध्यान या दोन बाबी उपयुक्त ठरतात. मनशक्ती केंद्रामध्ये वैज्ञानिक पध्दतीच्या आधाराने तणावमुक्तीसाठी शिबिरांची निर्मिती केली जाते. मनाला प्रफुल्लीत ठेवले तर आजार होणार नाहीत. मनाच्या विकाराने निर्माण झालेले आजार शरीरावर घातक परिणाम करतात. म्हणून माणसांनी ध्यानाच्या माध्यमातून ताण-तणाव यावर नियंत्रण मिळवावे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. विकास कदम म्हणाले की, “विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालये व शिक्षक यांच्याविषयी बदललेली मानसिकता ही शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण करणारी आहे. रयत शिक्षण संस्था सेवकांवर ताण निर्माण होवू देत नाही. शिक्षकांवरील ताण-तणावाचे नियोजन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे चेअरमन डॉ. रमेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. एस. पवार यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार श्री. सीताराम सावंत यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments